कोमल दामुद्रे
पावसाळ्यात सर्दी-खोकला-फ्लू यांसारखे इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या फळांचे सेवन अधिक करायला हवे.
डाळिंबात भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. डाळिंबाच्या फळामध्ये असलेले जीवनसत्तव ब लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढवते आणि रक्त परिसंचरण सुलभ करते.
लिचीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे ते अॅसिडिटी आणि अपचनासाठी उपयुक्त ठरते. लिचीमधील जीवनसत्त्व क हे सर्दीपासून बचाव करते. मुरुम आणि डाग यांसारख्या पावसाळ्यातील त्वचेच्या समस्यांवरही हे फळ उपयुक्त आहे.
नासपतीमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. पावसाळ्यात हे विशेषतः उपयुक्त आहे.
सफरचंद हे जीवनसत्त्वे ए, ब-१, ब-२ आणि क, फॉस्फरस, आयोडीन, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहेत.
जांभुळ हे गॅस्ट्रिक डिसफंक्शन कमी करण्यास मदत करतात कारण त्यात पोटॅशियम, फोलेट आणि लोह यांसारखे जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात.
आलुबुखार रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून बद्धकोष्ठता टाळू शकतात. कारण त्यात तंतू, तांबे, पोटॅशियम, जीवनसत्त्व क आणि के असते.
चेरी हे मोसमी पावसाळी फळ आहेत ज्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे त्यांना संक्रमणाशी लढण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यात मदत करते.