Chetan Bodke
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार कायमच आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो.
अक्षयचा नुकताच 'OMG 2'हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून सध्या त्याच्या चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे.
अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असले तरी, अक्षय एका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेतो.
अक्षयचा 'सौगंध' हा चित्रपट त्याच्या सिनेकारकिर्दितील पहिला चित्रपट होता, त्यासाठी त्याने ५० हजार रुपये मानधन आकारले होते. तर 'दीदार' या चित्रपटासाठी अक्षयने ७५ हजार रुपये मानधन आकारले होते.
अक्षय कुमारचे बरेच चित्रपट जेवढे सुपरहिट ठरले तितकेच ते सुपरफ्लॉप ही ठरले.
अक्षय कुमारचा 'OMG 2' आधी 'सेल्फी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'सेल्फी' आणि 'OMG 2' नंतर अक्षय आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षय आधी एका चित्रपटाकरिता ५० कोटी ते १०० कोटी इतके मानधन घ्यायचा. पण त्याच्या सलग फ्लॉप चित्रपटांमुळे त्याने त्याच्या मानधनात घट केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमने या चित्रपटासाठी ५ कोटी इतके मानधन घेतले आहे.