ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे अंगातून भरपूर घाम येतो आणि घसा कोरडा पडून तहान लागते.
तहान भागवण्यासाठी बहुतेक लोक उन्हाळ्यात थंड पाणी किंवा थंड पेय पितात. यामुळे तहान तर भागतेच, पण उष्णतेपासून काही प्रमाणात आरामही देते.
मात्र, फ्रिजचं थंड पाणी आरोग्याला हानी पोहोचवू शकते. थंड पाणी प्यायल्याने आराम मिळत असला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही.
उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो.
जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पेशी देखील आकसतात आणि त्यांचे काम नीट करू शकत नाहीत. त्याचा चयापचय आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.