कोमल दामुद्रे
लग्न म्हटलं की, प्रत्येक मुलीसाठी आयुष्याचा महत्त्वाचा व खास क्षण असतो.
प्रत्येक आई-वडीलांनी आपल्या मुलीच्या लग्नांचे सुखी स्वप्न पाहिलेच असेल.
अगदी तिच्या भातुकलीच्या खेळापासून ते नवआयुष्य सुरु करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची चिंता त्यांना सतावत असते.
लग्नात आपण आपल्या लेकीला अनेक भेटवस्तू देत असतो, शिवाय तिला रुखवत देण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे आपण तिला भांडी कुंडी सुद्धा भेटवस्तू म्हणून देत असतो.
पाठवणी करतांना आपल्या लेकीला भेटवस्तू देण्याची खूप जुनी परंपरा आहे, सगळे आई-बाबा आपल्या मुलीला तिच्या सुखासाठी काही काही शुभ वस्तू देत असतात
चुकून दिलेल्या या वस्तूंमुळे तुमच्या लेकीला तिच्या सासरी खूप त्रास होऊ शकतो.
लोणाच्याची चव तिखट असते अशात लेकीला लोणच दिलं तर तिच्या नवीन घरातही तसंच वातावरण निर्माण होऊ शकतं.
आपल्या लेकीला झाडू किंवा इतर साफ-सफाईशी संबंधित वस्तू द्यायला नको
तुमच्या लेकीच्या आणि जावयाच्या आयुष्यात संकट येऊ शकतं, त्या दांपत्यामध्ये दुरावा येऊ शकतो
चुकूनही चहा गाळण सुद्धा देऊ नका असं म्हणतात याने त्यांच्या आयुष्यात कधीच सुख टिकत नाही
असं म्हणतात आईने आपल्या लेकीला कधीही पोळपाट देऊ नाही.