साम टिव्ही ब्युरो
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई ही जोडी सर्वांनाच ठाऊक आहे.
मालिकेतील दोघांच्याही केमेस्ट्रीने चाहत्यांसह साऱ्याची मने जिंकली आहेत.
आता ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे.
नुकताच या दोंघाचा शाही थाटातला विवाहसोहळा पार पडला आहे.
सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
नेटकऱ्यासह त्यांच्या असंख्य चाहत्यांनाही प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अक्षयतृतीयेच्या दिवशी साखरपुडा करत या दोघांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.