कोमल दामुद्रे
आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतो. परंतु, मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये अधिक बदल होत असतात.
या दरम्यान त्वचेवर मुरुमे, त्वचा कोरडी होणे, त्वचा तेलकट होणे यांसारख्या समस्या सुरू होतात.
मासिक पाळीदरम्यान त्वचा अधिक कोरडी होते अशावेळी आपण पेट्रोलियम जेली लावायला हवी.
तेलकट त्वचेसाठी आपण कोरफड जेल किंवा ग्रीन टी लावावी.
या दरम्यान त्वचेवरील छिद्र बंद होतात त्यामुळे त्वचेला स्क्रब करणे गरजेचे आहे.
मासिक पाळीदरम्यान शरीराला हायड्रेट ठेवणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी सतत पाणी प्यावे.
अशावेळी त्वचेची चमक कमी होते. चेहरा कोरडा दिसू लागतो. त्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.