'या' कारणांमुळे होतात नवरा-बायकोचे घटस्फोट!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१) लग्ना आधी एकमेकांचं गोडीने ऐकतात पण लग्नानंतर मात्र इतरांचं ऐकून एकमेकांना बोलतात, भांडतात. नातं हे दोघांचं असत आणि एकमेकांवर विश्वास असेल तर नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून आपल्या पार्टनर वर अविश्वास दाखवणे चुकीची गोष्ट आहे.

2) परस्पर विश्वासाची वानवा. नातं जुळल्यापासून त्या नात्यात हळू हळू विश्वास निर्माण होऊ लागतो. पण छोट्याश्या चुकीमुळे अविश्वास निर्माण होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे नात्यात पारदर्शकता असावी.

3) आपण खरें मात्र समोरच्यानेच आपल्याला समजून घेतलं पाहिजे अशी फाजील अपेक्षा ठेवणे. काही वेळेस समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेऊन स्वतःला त्या जागी पाहून ठेवावं. भांडण, गैरसमज बोलून मिटतात. पण समोरच्या व्यक्तीनेच आपलं ऐकावं हि अपेक्षा ठेवू नये.

4) इतरांना नवरा बायकोच्या भांडणात आणणेआणि त्या दुसऱ्याचीच त्या भांडणात लुडबुड होऊन जाते. त्यामुळे आपापली भांडण आपणच मिटवून घ्यावीत.

5) कोणत्याही गोष्टीसाठी किंवा इच्छेविरुद्ध जाऊन शारीरिक व मानसिक छळ करणे. नैसर्गिक अपेक्षा भंग झाला की समोरच्या व्यक्तीला त्रास देणे.

6) मनाविरुद्ध झालेली लग्न किंवा लग्नापूर्वीचा न विसरला जाणारा भूतकाळ किंवा वर्तमानकाळ...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.