ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्या संबंधित नियम पाळणे फार गरजेचे आहे.
मात्र, आपण त्या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. बऱ्याचदा आपल्याला जे पदार्थ आवडतात, त्या पदार्थांचे आपण बिनधास्त सेवन करतो.
जेवणापूर्वी गोड पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. कारण गोड पदार्थ हे पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवणापूर्वी त्याचे सेवन केल्याने पाचक स्त्रावांचा प्रवाह वाढतो. त्यामुळे गोड हे जेवणापूर्वी खाणे योग्य ठरते.