ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते.
मासिक पाळीच्या दरम्यान वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे, जे पाळी संपल्यावर स्वत:हून कमी होते,असे का होते हे जाणून घेऊया.
मासिक पाळीमध्ये महिलांच्या प्रजनन हार्मोन्सची पातळी वाढते. याकाळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे पाणी टिकून राहते म्हणजेच शरीराच्या अवयवामध्ये पाणी साचते. त्यामुळे शरीरात साठलेल्या पाण्यामुळे वजन वाढते.
शरीरात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांना अधिक भूक लागते. यामुळे त्याना या काळात अधिक चवदार पदार्थ खावेसे वाटतात. तसेच या दिवसांमध्ये शारीरिक हालचाल कमी असल्याने वजन वाढू शकते.
मासिक पाळीदरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे पोट फुगळ्यासारखे होते. याकाळात महिलांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवतात आणि वजन वाढते.