ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माहीतीनुसार, कायद्यात विवाहाचे वय हे मुलांसाठी २१ आणि मुलींसाठी १८ आहे.
अलीकडेच, लग्नासाठी मुलीचे वय हे १८ वरून २१ करण्यात आले आहे.
पण या पलीकडे तुम्हाला काय वाटतं मुलां- मुलींनी कोणत्या वयात लग्न करणे योग्य आहे.
शारिरिक, मानसिक आणि आर्थिक या बांजूचा विचार केला तर मुलींनी २४ते २६ आणि मुलांनी ते २६ ते ३० या वयात लग्न करणे योग्य आहे.
मुख्यत: तुम्ही मानसिक आर्थिक दुष्ट्या लग्नासाठी तयार असाल तेव्हाच लग्न करावे.
आजकाल लग्न करण्यासाठी वयाचे बंधन पाळले जात नाही.
माहितीनुसार, १३ ते १८ या वयामध्ये लग्न करू नका. साधारण 18 वर्षानंतरच बुद्धी आणि शरीर हे दोन्ही परिपक्व होत असतं. त्यामुळे त्यानंतरच लग्नाचा विचार करणं योग्य आहे.
तसंच तुम्ही जर चाळीशी पार केली असेल तरीही लग्नाचा विचार करणं तुमच्यासाठी योग्य नाही.