Ankush Dhavre
आई वडील होणं हा जितका आनंदाचा क्षण आहे तितकाच तणाव वाढवणारा देखील आहे.
बाळ झाल्यानंतर पती पत्नीसाठी सुरुवातीचे काही वर्ष कठीण जातात. यादरम्यान इच्छा नसतानाही तणाव येतोच.
मुलाचं संगोपन करण्यासाठी पती पत्नी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. बाळाचं संगोपण करण्यासाठी झोपेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे दोघांमध्ये वाद होतात.
बाळ लहान असताना अनेक कामं वाढतात. त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडणं वाढू लागतात.
बाळाची जबाबदारी कोणाची? या कारणामुळे दोघांमध्ये वाद होतात. बाळाच्या जबाबदारीसह घरची कामं देखील पत्नीला करावी लागतात.
बाळ झाल्यानंतर जोडप्यात दुरावा वाढू लागतो. आधी ते एकमेकांना वेळ देऊ शकत होते. मात्र बाळ झाल्यानंतर हेच त्यांच्या भांडणाच कारण बनते.
प्रसूती रजा संपल्यानंतर कामावर लक्ष देण्याची वेळ येते. अशा वेळी बाळाचा सांभाळ कोण करणार? कोणाचं करियर खराब होईल? यावरून वाद होऊ लागतात.
बाळ झाल्यानंतर खर्च वाढतो त्यामुळे देखील वाद होतात.
आई - वडील आपल्या पद्धतीने बाळाचे संगोपन करत असतात. मात्र लहान मोठ्या गोष्टीवरून दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असतो.