ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कंबर हा शरीराचा रुंद भाग असल्याने रोग्याच्या अनेक तक्रारी या पोटापासून सुरु होतात. अशावेळी कंबरेला दोरा बांधल्याने त्याला होणारी बाधा ही आवळली जाते आणि पोटदुखी होत नाही.
पूर्वीच्या काळी पावला पावलावर डॉक्टर नव्हते. त्यामुळे एखादा इलाज करायचा असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची. अशावेळी करदोरा हा तात्पुरता आराम देण्यासाठी चांगला मानला जात होता.म्हणून प्रत्येकाच्या कमरेला करदोरा बांधला जायचा
जंगल किंवा शेतात काम करताना पोटाला करदोरा बांधला जाई. कारण अशाठिकाणी सर्प दंशाची भिती अधिक होती. सर्पदंश शरीरात भिनू नये यासाठी कमरेत करदोरा बांधला जाई.