ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अक्षता पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात, औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात.
अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता.
लग्न लागल्यानंतर वधू वराच्या अंगावर अक्षता टाकल्या जातात. पण या अक्षता तांदळाच्याच का असतात असा तुम्हालाही पडला असेलच.
तांदळाला कधीही किड लागत नाही त्यासाठी या शुभ प्रसंगी अक्षतांचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या नात्यात कधीच किड लागू नये असा त्याचा अर्थ होतो.
तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते.
तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते.
खरेतर जितका जुना तांदूळ तितकाच चांगला त्याचा स्वाद असे म्हटले जाते.