ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रानुसार, रात्री नखे कापणे अशुभ मानले जाते.
रात्री केस आणि नखे कापल्याने लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते.
सामान्यत: रात्री नखे कापू नयेत हा नियम फार पूर्वीपासूनचा आहे.
महत्वाचे म्हणजे रात्री-अंधारात धारदार वस्तूंचा वापर केल्यामुळे बोटाला, शरीराच्या अन्य अवयवाला इजा होण्याची शक्यता असते.
रात्री आधांरात नख कापल्याने इकडे तिकडे पडू शकतात म्हणून रात्री नखे कापले जात नाहीत
नखातून घाण, माती, जीव-जंतू पुन्हा आपल्या शरीरात जाऊन आरोग्यही बिघडते यामुळे ती दिवसा कापावीत.
म्हणूनच रात्री नख कापल्यास घरातील मंडळी आपल्याला ओरडतात.