सोमवारपासून औरंगाबाद शहर अनलॉक असणार आहे तर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी असणार आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा पॉजिटीव्हिटी रेट २.२४ टक्के तर ऑक्सिजन बेडची टक्केवारी २२.१९ इतकी असल्याने सोमवारपासून औरंगाबाद शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून शहरातील सर्व व्यवहार सुरू राहतील. याबाबत औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात दुपारी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसह इतर सेवा सुरू राहतील तर सायंकाळी ५ वाजेनंतर ग्रामीण भागात संचारबंदी कायम राहणार आहे.(Aurangabad city to be 'unlocked' tomorrow; Curfew in rural areas after 5 p.m.)
हे देखील पाहा
औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग असा पॉजिटीव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा विचार करून महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग असे दोन वेगवेगळे निर्णय घेण्यात आले, यातुन शहरवासियांना लॉकडाऊनमधून पुर्णपणे सुट मिळाली. तर ग्रामीण भागातील लोकांना आणखी काही काळ पॉझिटिव्हिटी कमी होण्याची वाट पाहावी लागेल.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने उद्यापासून राज्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. औरंगाबाद पहिल्या गटामध्ये असल्याने सर्व निर्बंध शिथिल होणार आहेत. त्यामुळे आता औरंगाबाद करांना दिलासा मिळालेला आहे.
Edited By : Pravin Dhamale
ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.