12 वी परिक्षा रद्द करण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय शक्य

udhav thakare.jpg
udhav thakare.jpg

वृत्तसंस्था : केंद्र सरकारने Central Government मंगळवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE आणि भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र ICSE च्या 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  या पार्श्वभूमीवर आज (3 जून) राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक  घेणार आहेत. केंद्र सरकारने 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आज  होणाऱ्या बैठकीत राज्यसरकार  परीक्षेबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरूच असताना  आणि तिसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता 12 वीच्या विद्यार्थ्यांची यंदा परीक्षा घ्यायची की नाही,  याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत.  (Decision on cancellation of 12th exam possible till noon) 

काल (2 मे ) विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी 12 वीची परीक्षा यंदा घेतली जाऊ नये, अशी मागणी  राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी एकमताने केली आहे. त्यामुळे आता यंदा 12 वीच्या परीक्षा होणार नसल्याच  जवळपास नक्की झालं आहे.  आज मुख्यमंत्री याच निर्णयाची अधिकृत घोषणा करणार आहेत.  दरम्यान,   कोरोना विषाणूच्या साथीची Corona Virus परिस्थिती पाहता  काल  सीबीएसई आणि आयसीएसईची  12 वीची परीक्षा रद्द  करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते.  संबंधित बैठकीत सीबीएसई योग्य निकषांनुसार 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी पावले उचलेल. मात्र तरीही  मागील वर्षाप्रमाणेच, काही विद्यार्थी परीक्षा देण्यास उत्सुक असल्यास, अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई कोविड परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना विशेष पर्याय देईल, असेही सांगण्यात आले. 

सीबीएससीकडून 12 वीची परीक्षा जुलै आणि 26 ऑगस्ट रोजी परीक्षा होण्याचा पर्याय  
मात्र,  केंद्रसरकारच्या या निर्णयाने समाधानी नसल्याचे मत सीबीएससीने व्यक्त केले आहे.  त्यामुळे सीबीएसईने 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सीबीएसईच्या प्रस्तावानुसार सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होईल. यासह मंडळाने दोन पर्यायही दिले आहेत. यामध्ये अधिसूचित केंद्रांपैकी एकामध्ये 19 प्रमुख विषयांसाठी नियमित परीक्षा आयोजित करण्यात यावी, तर दूसरा पर्याय असा की, विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, त्याच शाळांमध्ये अल्प-मुदतीसाठी परीक्षा घेण्यात यावी.  त्याचबरोबर  केंद्राच्या या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.  त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्यसारकरांच्या निर्णयानंतर सीबीएससी काय पाऊल उचलणार ही पाहणए महत्त्वाचे ठरणार आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com