Ankush Chaudhary Spoke About Character In Maharashtra Shaheer: अभिनेता अंकुश चौधरी सध्या आपल्या सिनेकारकिर्दीतील पहिल्या वहिल्या बायोपिकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अंकुशने मुख्य भूमिका साकारली असून सध्या त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत शाहीर साबळेंची भूमिका जर अंकुशने साकारली नसती, तर कोणता कलाकार त्या भूमिकेसाठी परफेक्ट ठरला असता, यावर त्याने भाष्य केले आहे.
अंकुशला आपण आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून, नाटक आणि मालिकेच्या माध्यमातून भेटलो आहोत. नेहमीच आपल्या अभिनयातून सर्वच पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा तो प्रयत्न करतो. दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळीतला सूर्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याचे अढळ स्थान निर्माण करून गेले.
नुकताच अंकुशने ‘सकाळ डिजिटल’ सोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडले. चित्रपटात अंकुशने शाहीर साबळेंची भूमिका साकरली आहे. जर त्याला ही भूमिका साकारायला मिळाली नसती तर, त्याला आणखी कोणत्या कलाकाराने ती उत्तम साकारली असती यावर अंकुशने आपले मत मांडले. (Marathi Actors)
चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सर्वांनाच या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली होती. त्याने साकारलेली भूमिका पाहून अनेक सेलिब्रिटींनी आणि अनेक चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाची घोषणा होताच सर्वांनाच शाहीर साबळेंची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका साकारणार हे जाहीर होताच सर्वांनाच जरा भीती जाणवत होती. पण चित्रपट पाहिल्यानंतर त्याने अत्यंत मेहनतीने ही भूमिका लीलया पेलली आणि सर्वांना सुखद आनंद दिला. (Marathi Film)
यावेळी अंकुश म्हणतो, “या चित्रपटाची प्रक्रिया गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. ज्याची मला कल्पना होती. पण मला जेव्हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी विचारले तेव्हा काही वेळासाठी तरी का होईना धक्का बसला होता. कारण ही भूमिका स्वतः केदार शिंदे यांनी करावी असं मला वाटत होतं.”
“कारण दोघांचा चेहरा एक आहे, गाणं, नाटक, भारुड केदार अगदी बाबांसारखं करतो. आणि मुख्य बाब म्हणजे, तो स्वत: शाहीर साबळेंचा नातू आहे. त्यामुळे ही भूमिका त्यानेच उत्तम पद्धतीने साकारली असती आणि न्यायही दिला असता. पण केदारला ही भूमिका मीच साकारावी असा आग्रह असल्याने मग मी शाहीर साबळेंच्या भूमिकेत आलो.” असं अंकुश यावेळी म्हणाला.
अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी तिकीटबारीवर ३० लाखांचा गल्ला जमावलाय. शनिवार- रविवार आणि सोमवारी आलेली १ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी, अशा गोष्टींमुळे महाराष्ट्र शाहीर लवकरच कोटींच्या घरात जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. चित्रपटाचा ७ कोटींचा बजेट असून दिग्दर्शकांसह निर्मात्यांना चित्रपट १० कोटींपर्यंत गल्ला जमवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.