10 वर्षांत पाण्याची भीषण टंचाई,पाणी मिळणार रेशनिंगवर?

Water on rationing?
Water on rationing?

कितीही पाऊस पडला तरी राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झालीय. हिच स्थिती कायम राहिल्यास पुढच्या 10 वर्षांत पाणी रेशनिंगवर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात पाण्याचा वापर वाढतोय. पण पाणी अडवलं आणि जिरवलं जात नाही. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही. पाणी रेशनिंगवर मिळेल तो दिवस फार दिवस लांब नाही. सध्याचा भूगर्भातील पाणी उपसा आणि जलप्रदूषणाचं प्रमाण पाहता येत्या दहा वर्षांत राज्यातल्या काही ठिकाणी पाणी रेशनिंगवर देण्याची वेळ सरकारवर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला सध्या 2 हजार 18 टीएमसी एवढ्या पाण्याची गरज लागते. येत्या काळात राज्यातील कृषी, औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढेल. ही गरज 5 हजार 707 टीएमसी एवढी असेल. उपलब्ध पाणी आणि गरज याचा मेळ घालण्यासाठी पाण्याचं रेशनिंग करावं लागेल. हे टाळण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवावी लागेल. शिवाय महाराष्ट्राची भूजल पातळीही वाढवावी लागेल. त्यासाठी गाव पातळीवर उपाययोजना कराव्या लागतील.

वीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ एवढी वाढेल याची कुणाला कल्पनाही नव्हती. त्याचप्रमाणं येत्या काळात रेशनिंगवर पाणी मिळेल ही आता वाटत असलेली कल्पनाही सत्यात उतरु शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com