कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

Kalyan Dombivali Water issue will be Resolved Assured Ajit Pawar
Kalyan Dombivali Water issue will be Resolved Assured Ajit Pawar

कल्याण : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमध्ये सध्या पाणी, कचरा, रस्ते यांच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २७ गावांच्या समस्या उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. 27 Village Water Case Kunal Patil meet Ajit Pawar

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमधील नागरिकांना फक्त आश्वासने देण्यात आली आहेl, मात्र आश्‍वासनांची पूर्तता अजून झाली नसल्याने, नागरिक देखील संतापले आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तसेच या नागरिकांना कचरा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि २७ गावांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. उपमुख्यमंत्री पवार (Ajitdada Pawar) यांनी पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि यासंबंधी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन, लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

(Edited By - Digambar Jadhav)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com