
No Sugar Challenge : दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत काही ना काही गोड खातच असतो. सकाळी उठल्याबरोबर आपण साखरेचा गोड चहा पितो. जास्ती साखर खाणे किंवा गोड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.
भारतातील लोकांना जास्ती गोड पदार्थ खाण्याची आवड आहे कोणताही सण असला की, अगोदर गोड काहीतरी बनवून आपण तो सण साजरा करतो. मिठाई,चॉकलेट,केक, आइस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स, चहा अशा गोड पदार्थांचे सेवन करायला भारतील लोकांना खूप आवडते.
2. हृदय निरोगी राहील
जेव्हा शुगरचे फॅटमध्ये रूपानंतर होते तेव्हा रक्तात घाणेरडे कॉलेस्ट्रॉल जमा होते त्यामुळे बीपी हाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयविकराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे तुम्ही जर साखर खाण्याचे प्रमाण कमी केले तर तुमचे हृदय निरोगी राहील.
3. लिव्हरला फायदा होईल
जर तुम्ही जास्ती साखर खात असाल तर तुमच्या लिव्हरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.लिव्हरला महत्वाचे ऑर्गन आहे. लिव्हरशी संबधित Non-alcoholic fatty liver disease (NAFLD) हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारात साखरचे प्रमाण खूप कमी असावे.तसेच जर तुम्ही ३० दिवस पूर्णपणे साखर खाणे बंद केली तर तुमच्या पूर्ण आरोग्याला उत्तम फायदा होईल.तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर,आयन मिळून तुम्ही निरोगी राहाल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.