
राज्यशास्त्रात निपुण असलेल्या आचार्य चाणक्य यांचे शब्द यशस्वी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे शब्द ऐकायला खूप कठोर असतील पण ते आत्मसात केले तर यशस्वी जीवन जगता येते.
आपल्या व्यस्त जीवनात (Life) आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अडचणींमधून बाहेर येण्यास मदत करतील. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये नातेसंबंध मजबूत करण्यासाठी चार गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नाही परंतु याचा अर्थ असा नाही की, फसवणूक आणि छळ करून नाते मजबूत होते. त्याएवजी फसवणूक आणि कपट नात्याचा पाया कमकुवत करतात.
आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की नाते मजबूत करण्यासाठी प्रेम (Love) आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे.
आचार्य चाणक्यांच्या नीतींनुसार माणसाच्या बोलण्यातला गोडवा त्याला सर्वांमध्ये प्रसिद्ध बनवतो. प्रत्येकाला त्याच्या जवळ राहायचे आहे. गोड बोलणारी माणसं सगळ्यांना प्रिय असतात. त्यामुळे नाते (Relationship) घट्ट करण्यासाठी बोलण्यात गोडी ठेवा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, नातेसंबंधांमध्ये अहंकार सोडला पाहिजे. अनेक चांगली नातीही अहंकारामुळे तुटतात. चाणक्याच्या मते, व्यक्तीचा अहंकार कधीही नात्यापेक्षा मोठा नसावा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.