
Saving Money : हल्लीच्या महागाईच्या जगात पैसा प्रत्येकालाच हवा असतो. वाढत्या गरजांमुळे माणूस पैसा मिळवण्यासाठी अनेक चांगले वाईट कर्म करतो. अशातच आपल्याला अचानक धनप्राप्ती झाली तर ?
1. चुकूनही हे काम करू नका
अनेक वेळा पैसा आला की लोकांना गर्व येतो. त्यामुळे इतरांशी आपले नातेसंबंध (Relationship) बिघडतात. दिखावा करण्याऐवजी तो पैसा इतरांना आणि स्वत:च्या मदतीसाठी वापरला पाहिजे. ज्यामुळे कठीण काळात आपली मदत करण्यासाठी लोक पुढे सरसावतात.
2. दुसऱ्याची मदत नको.
आपल्या चाणक्य धोरणात आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्हाला पैसा मिळेल तेव्हा तुम्ही अति संयमाने खर्च करायला हवा. संकटकाळात पैसा हा सर्वात मोठा मित्र असतो. अशावेळी पैसे वाचवून ठेवत नसून तर आपल्याला इतर वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागते.
3. पैशाची प्रशंसा करू नका
चाणक्य म्हणतात की, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांसमोर त्याची बढाई मारू नका. असे केल्याने चोर आणि शत्रू सक्रिय होतात आणि ते तुमचे नुकसान करू शकतात.
4. ही चूक नको
अचानक आलेल्या पैशाचा वापर इतरांना अपमानित करण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. पैशाचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच केला पाहिजे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.