
Chanaky Niti : समोरच्या व्यक्तीला आपल्या बुद्धीने पराभव करणार आचार्य चाणक्य होते. त्यांनी मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी म्हणजे यश, फसवणूक याबद्दल सांगितले आहे.
यशाचे शिखर गाठत असताना सर्वात मोठा अडथळा म्हणजे फसवणूक होय. त्यामुळे चाणक्याच्या काही गोष्टीचे पालन करून आयुष्यात फसवणूक होणार नाही आणि यशाच्या (Success) मार्गात पुढे जाण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ याविषयी चाणक्य नीति काय आहे?
1. वाणी आणि संगत
वाणी ही अशी गोष्ट आहे जी माणसाला जमिनीवरून जमिनीवर घेऊन जाऊ शकते आणि खड्ड्यातही टाकू शकतो. त्यामुळे बोलताना नेहमी विचार करून बोलले पाहिजे.आपल्या बोलण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर नेहमी गोड वाणीचा वापर करा तसेच सज्जनांचा सहवास असणे गरजेचे आहे. त्याने तुमचे व्यक्तिमत्व वाढते आणि तुम्ही आयुष्यात चुकीचा मार्गी जात नाही.
2. कठीण परिश्रम
खूप लोकांना असे वाटते की मेहनत न करता त्यांना यश मिळाले पाहिजे आणि असे बोलून ते सर्व काही नशिबावर सोडून देतात.मेहनत करण्यापासून चोरी करू लागतात.त्यावर आचार्य चाण्यक यांचे असे मत आहे की जे कठोर परिश्रम करत नाहीत. सरळ स्वतःला नशिबावर सोडून देतात.असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही.अशा वेळी कठोर परिश्रम करून यशाचे शिखर गाठले पाहिजे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.