
Morning Health Tips : आपल्या शरीराला आवश्यक पोष्टीक आहार योग्य वेळी घेणे गरजेचे आहे. धावपळीच्या जीवनात काळी सकाळी ऑफिसच्या घाईगडबडीतब लोक अनेकदा नाश्ता करायचे विसरतात.
योग्यवेळी आहार न घेतल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळच्या नाष्टा खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात.पण सकाळचा नाश्ता करणे का गरजेचे आहे हे खूप लोकांना माहीत नाही चला तर मग याबद्दल माहिती जाणून घेऊया सकाळचा पोटभर नाश्ता करण्याचे काही फायदे.
1. टाईप टू मधुमेहाचा धोका
मधुमेहापासून (Diabetes) दूर राहण्यासाठी सकाळचा नाष्टा करणे खूप गरजेचे असते. एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे नाश्ता करतात. त्यांचा मधुमेहाचा धोका 30% ने कमी होतो.
2. एनर्जी लेव्हल वाढते
सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते पोस्ट आहार घेतल्यानंतर घरातून बाहेर पडल्यावर शाळेत हालचाली मध्ये वाढ होते लवकर भूक लागत नाही ऊर्जा टिकून राहते डायनॅमिक राहिल्याने वजन नियंत्रणात येते थकवा जाणवत नाही.
4. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
एका संशोधनानुसार,सकाळचा नाश्ता वगळण्याने तुमचे वजन जास्त वाढू शकते कारण सकाळी काही न खाल्ल्यामुळे दिवसभर सतत भूक लागते आणि काहीतरी बाहेरील तेलकट,अनहेल्दी आहार मोठ्या प्रमाणात घेतो. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब या समस्या होऊन हृदयविकार (Heart attack) होऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.