
Patience Tips Marathi : असे म्हटले जाते की, मन स्थिर नसले तर सोपे कामही अवघड वाटू लागते. माणसाच्या चंचल मनापेक्षा काहीही नाही. मनावर ताबा असल्यास सर्व काही सहज साध्य करता येते.
बहुतेक लोकांचा कठीण प्रसंग असल्यास त्यांचा संयम सुटतो, त्यांचे मन अस्वस्थ होते, त्यामुळे त्यांचे काम बिघडते. रागाने भरलेले मन अनेकदा विनाशासाठी कारक ठरते. म्हणून प्रयत्न करा की परिस्थिती कितीही कठीण (Difficult) असली तरी मनात संयम आणि शांतता ठेवा.
बहुधा माणूस रागाच्या भरात असा निर्णय घेतो, ज्याचा मन शांत झाल्यावर त्याला पश्चाताप होतो. पण तोपर्यंत परिस्थिती बिघडते. यानंतर तुम्ही कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्यात सुधारणा करता येत नाही. म्हणूनच पश्चाताप करण्यापेक्षा मन शांत ठेवणे चांगले. याशी संबंधित काही प्रेरक वाक्ये जाणून घेऊया.
1. जर तुमचे मन जास्त चंचल असेल किंवा नेहमी चंचल असेल तर तुम्हाला कितीही चांगले गुरू किंवा संत मिळाले तरी त्यांनी दिलेल्या शिकवणीचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.
3. कोणत्याही व्यक्तीचे मन तेव्हाच कळू शकते जेव्हा कोणी त्यांना प्रेमाने आणि सहानुभूतीने विचारले. असे मानले जाते की शांत मनाची व्यक्ती इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा म्हणून कार्य करते.
4. जो खेळात एकदा हरला तो पुन्हा जिंकू शकतो, पण जो पराभव स्वीकारतो त्याला कधीच यश मिळत नाही.
5. तुम्हाला तुमचे यश कधीच प्रत्यक्ष दिसणार नाही, कारण ते तुमच्या मनात घडते. ज्याने मन जिंकले आहे त्याला दुसरा कोणी पराभूत करू शकत नाही किंवा विजयासाठी तयारही करू शकत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.