
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांची विशिष्ट परिक्रमा पूर्ण करुन आपली राशी बदलत असतो. यामुळे अनेक राशींवर त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत १७ सप्टेंबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक त्रासही सहन करावा लागू शकतो.
सूर्य हा ग्रह १८ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहिल त्यामुळे पुढील ३० दिवस काही राशींनी सावध राहाणे गरजेचे आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच अनेक आव्हांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगायला हवी
1. तूळ
येत्या महिन्यात पैशांशी (Money) संबधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच धनहानी होऊ शकते. गुंतवणूक (Investment) करणे टाळा. कामात नुकसान होण्याची शक्यता. नोकरी गमवावी लागू शकते. कामात अधिक लक्ष घाला. अधिक ताणतणावाचा (Stress) सामना करावा लागेल.
2. कुंभ
अशुभ परिणाम मिळतील. कोणताही निर्णय घेताना जपून घ्याल नुकसान होण्याची शक्यता. भावडांशी मतभेद होतील. नकारात्मक प्रभावाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शांत आणि संयम राखा.
3. मीन
कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या घरात आर्थिक संकटाचा काळ सुरू होऊ शकतो. अहंकारी लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात. गंभीर मानसिक तणावाखाली असाल. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.