Happy Independence Day 2022 : पाकिस्तानची १४ ऑगस्ट आणि भारताची १५ ऑगस्ट 'ही' तारीख स्वातंत्र्यदिनासाठी का निवडण्यात आली ?

भारत आणि पाकिस्तानाची स्वातंत्र्य दिनाची तारखी कधी ठरली ?
Happy Independence Day 2022
Happy Independence Day 2022Saam Tv

Happy Independence Day 2022 : यंदा भारतात ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा 'आझादी का अमृत महोत्सव' सगळीकडे साजरा करण्यात येत आहे. भारताने स्वातंत्र्य दिनाचे ७५ वे वर्ष पूर्ण करुन ७६ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी (१७५७ -१८५८) आणि ब्रिटीश राजवट (१८५८-१९४७) यांनी राज्य केल्यानंतर, सुमारे २०० वर्षांच्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले.

भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आणि धैर्याने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला मुक्त करण्यासाठी ब्रिटीश राजवट दूर करण्यात आली. या दोन शतकांच्या दरम्यान नियोजित घटनांची मालिका घडली ज्यात स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन आणि इतरांसह भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. (Happy Independence Day 2022)

तुम्ही कधी विचार केला आहे का की १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला यांच दिवशी स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो ?

Happy Independence Day 2022
Celebration of 75th Independence Day : भारताची पहिली महिला पायलट, वयाच्या २२ व्या वर्षी केला अनोखा विक्रम !

१९२९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी ‘पूर्ण स्वराज’ किंवा ब्रिटीश वसाहतीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची हाक दिली तेव्हा २६ जानेवारी हा पहिला ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून निवडला गेला. भारताला (India) स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला.

१९३० नंतर काँग्रेस पक्षाने हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणे सुरूच ठेवले ज्या दिवशी भारत औपचारिकपणे सार्वभौम देश बनला आणि यापुढे ब्रिटीश अधिराज्य राहणार नाही त्या दिवशी भारत पूर्णपणे स्वतंत्र्य होईल असे ठरवले गेले.

१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन कसा झाला?

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतीयांनी ब्रिटीशांना आपला देश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर ब्रिटिश संसदेने लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताची सत्ता हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते.

India's 75th Year Of Freedom
India's 75th Year Of Freedom Canva

भारताला स्वातंत्र्य देण्यास झालेल्या विलंबावर भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी आक्षेप घेतला. माउंटबॅटन यांनी ही तारीख १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना रक्तपात किंवा दंगली नको आहेत असे सांगून त्यांनी याचे समर्थन केले. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही भारतीय स्वातंत्र्याची तारीख म्हणून निवडली.

१५ ऑगस्टच का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ' फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांचा उल्लेख केला आहे

त्यांनी असे सांगितले आहे की, "ही तारीख एकदम निवडण्यात आली. खरंतर एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती. मी या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार होतो. जेव्हा मला सांगण्यात आलं की आपल्याला एखादी तारीख ठरवायची हे. तेव्हा मला कळलं की ती लवकरची असायला हवी. मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्कं होतं. मग माझ्या मनात १५ ऑगस्ट ही तारीख आली. कारण त्यावेळी जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून दोन वर्षं झाली होती."

जपानचे सम्राट हिरोहितो यांनी १५ ऑगस्ट १९४५ रोजी आपल्या देशाला संबोधित करून आत्मसमर्पणाची घोषणा केली. हिरोशिमा आणि नागासाकी येथे अनुक्रमे ६ आणि ९ ऑगस्ट रोजी अणुबॉम्ब हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले, जपान शरण जाणाऱ्या अक्ष शक्तींपैकी शेवटचे होते.

माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सने ४ जुलै १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केले. भारत आणि पाकिस्तानचे दोन स्वतंत्र वर्चस्व स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१४ ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य कसे मिळाले?

पण १४ ऑगस्टला पाकिस्तानला (Pakistan) स्वातंत्र्य कसे मिळाले? प्रत्यक्षात तसे झाले नाही. भारतीय स्वातंत्र्य विधेयकाने दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याची तारीख १५ ऑगस्ट दिली आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या पहिल्या तिकिटावर १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून उल्लेख केला होता.

परंतु १९४८ पासून, पाकिस्तानने १४ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून चिन्हांकित करण्यास सुरुवात केली, कारण कराचीमध्ये सत्ता हस्तांतरणाचा समारंभ १४ ऑगस्ट १९४७ रोजी आयोजित करण्यात आला होता किंवा त्यावेळी १४ ऑगस्ट १९४७ ही रमजानची २७ तारीख होती. मुस्लिमांसाठी हा एक अतिशय पवित्र महिना असून ती तारीख देखील पवित्र मानली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com