मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून दोन्ही राज्यांत तू-तू मैं-मैं सुरू झाले असून, महाराष्ट्र सरकारच कर्नाटकातील पूरस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. मात्र, आलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आवश्यक तेवढे पाणी सोडले नसल्याने महाराष्ट्राच्या सांगली व कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगत, कर्नाटकने आलमट्टीतून पाच लाख क्युसेकने पाणी सोडावे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
बेळगाव, विजापूर, रायचूर, कलबुर्गी व यादगीर जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर बनत आहे. कोयना धरणातून महाराष्ट्रने २० हजार क्युसेकने पाणी सोडणे अपेक्षित असताना, त्यामध्ये वाढ करत एक लाख २५ हजार क्युसेक इतके पाणी सोडले आहे. त्यामुळे, कर्नाटकच्या या भागात पूर आला असून, महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. पावसाच्या पडणाऱ्या अतिरिक्त पाण्यासंदर्भात सरकारने काहीच केले नाही, अशी नाराजीही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
WebTitle : maharashtra phase floods due to improper management of karanataka government
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.