रत्नागिरी : गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी परगावाहून येणा-या काेकणवासीयांसाठी प्रशासनाने नियम व अटी लागू केल्या हाेत्या. यामध्ये काेविड १९ ची तपासणी अहवाल हा महत्वाचा मुद्दा मानला जात हाेता. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी एक लाख ९१६ चाकरमानी गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान छुप्या पद्धतीने आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात त्यातील १२ जणांना काेविड १९ ची Covid19 लागण झाल्याची माहिती समाेर आली आहे.
यामध्ये गुहाघर तालुक्यातील १२ चाकरमान्यांना काेविड १९ ची लागण झाल्याची माहिती समाेर आली आहे. प्रशासनाने अनेक नियम घालून दिले हाेते. तरी ही अनेक जण छुप्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले.
तपासणी नाक्यांवर देखील ज्या नागरिकांनी तपासणी केली नव्हती त्यांची तपासणी केली गेली. गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात एक लाख ९१६ चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यापैकी रॅपिड टेस्टच्या माध्यमातून १२ जणांना काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना प्रशासनास अंधारत न ठेवता काेविड १९ ची चाचणी केली नसल्यास गावातील प्राथमिक आराेग्य केंद्रात करुन घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.