डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून येथील नागरिक करत होते. ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) आणि १४ गाव सर्व पक्षीय विकास समिती यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत साम टीव्हीने बातमी (Saam Tv News) प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आमदार पाटील यांनी हा विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला होता. परंतु, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पालकमंत्री असताना ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. पंरतु, घोषणा होऊनही हा विषय अडकूनच राहिला होता. मात्र, आता शासनाने जीआर काढल्याने या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पतातडीने दखल घेतली आणि याबाबतचा जीआर काढला.
'या' गावांचा होणार नवी मुंबई महावपालिकेत समावेश
१) दहिसर
२) मोकाशी
३) वालिवली
४) पिंपरी
५) निघू
६) नावाळी
७) वाकलण
८) बामार्ली
९) नारीवली
१०) बाळे
११) नागाव
१२) भंडार्ली
१३) उत्तरशीव
१४) गोटेघर
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.