सातारा : गणेशाेत्सव काळात हजाराेंच्या संख्येने भाविक रत्नागिरी जिल्ह्यात येणार आणि तिसरी लाट येणार म्हणून सातत्याने बाेंब मारणा-या ठाकरे सरकाराने जिल्ह्यातील २४ काेराेना केंद्र बंद केली आहेत. रत्नागिरीच्या लाेकांना मारुन टाकायचे ठरविले आहे ठाकरे सरकारने असा प्रश्न निलेश राणेंनी ट्विट करुन उपस्थित केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे २४ काेराेना सेंटर बंद केली आहेत. या प्रत्येक काेविड सेंटरवर २५ ते ३० लाख रुपये खर्ची पडले आहेत. अचनाक कर्मचा-यांना काढण्यात आले. नर्सेस, वाॅर्डबाॅय यांना सांगितले पण नाही त्यांना कामावरुन का कमी केले आहे. लांजा येथे एका काेविड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास कुलुप लावण्यात आले.
गणेशाेत्सव काळात आता हजाराेंच्या संख्येने भाविक जिल्ह्यात येणार आहे. अशा परिस्थिीत २४ काेविड सेंटर का बंद केली जात आहेत हे काेणालाच माहिती नाही. अधिका-यांना विचारले तर ते सांगताहेत वरुन आॅर्डर आली. रत्नागिरीच्या लाेकांना मारुन टाकायचे ठरविले आहे ठाकरे सरकारने असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
तिसरी लाट येणार म्हणून सातत्याने सांगितले जात आहे आणि संकट संपले नसले तरी तुमच्या प्रशासनातील लाेक काेविड सेंटर का बंद करीत आहे. काय ठरवलं काय ठाकरे सरकराने nilesh rane uddhav thackeray आम्ही करणार असंच चालणार हे ठरविले आहे असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे.
लाेक चप्पलनेने मारतील. अनेकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांची नाेकरी पुन्हा तुम्हांला द्यावी लागेल त्यासाठी भाजप आंदाेलन छेडणार आहे. काेविड सेंटर तुम्हांला उघडावी लागतील. ती सुरु करावी लागतील. ताेपर्यंत भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी गप्प बसणार नाहीत असेही राणेंनी स्पष्ट केले.
24-covid19-centers-closed-ratnagiri-nilesh-rane-questions-uddhav-thackeray-maha-government-sml80
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.