जळगाव - गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह जळगावात कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या २ दिवसांपासून जळगावमध्ये (Jalgaon) तापमानाचा पारा 7.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. अशात सोमवारी (३१ जानेवारी) रात्री जळगावात अतिथंडीने चार जणांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हे चौघे देखील रस्त्याच्या कडेला झोपले होते आणि अतिथंडीमुळे गारठून या चौघांचा मृत्यू झाला.
हे देखील पहा -
हे चौघे देखील जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. हे चौघे सोमवारी रात्री ते शहरातील विविध भागात मृतावस्थेत आढळले आहेत. एकाचा मृतदेह निमखेडी रस्त्यावर, , दुसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात तर तिसऱ्याचा पांडे डेअरी चौकात तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.
मृत व्यक्ती नेमके कोण आहेत व त्यांचे नाव काय आहे? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. संबंधितांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात या चौघांच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.