औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका पठ्ठ्याने स्वतःला राज्याचा सामाजिक न्यायमंत्री (Minister) म्हणून घोषित केले आहे. यासंबंधीचे बॅनर तयार करून हा पठ्ठ्या स्वतःच्या गाडीवर लावून फिरत आहे. भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे. त्याने आपल्या गाडीवर लावलेले बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. (Aurangabad Latest News)
नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा पार पडला. या दौऱ्यातच भारत फुलारे या पठ्ठ्याने मी स्वतःला सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करतो अशी घोषणा केली. विशेष बाब म्हणजे काही नागरिक या पठ्ठ्याकडे आपल्या समस्या घेऊन देखील आल्याचे त्याने सांगितले.
'संविधानानुसार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. परिणामी महाराष्ट्रातील विविध समस्या वाढत आहेत. असं या पठ्ठ्याने म्हटलं आहे. (Aurangabad Todays News)
'मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर पोरकेपणाची वेळ आली आणि यामुळे आता जनतेने स्वयंघोषित मंत्रीपदे घेण्याची गरज आहे. यामुळे मी जनतेच्या हितासाठी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढण्याची शपथ घेतली आहे' असं या पठ्ठ्याने सांगितले आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.