
टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील तरूण शेतकरी सागर धांगट याने आपल्या शेतातून काढलेले टोमॅटो थेट गाईंना चारा म्हणून खाऊ घातले आहेत. भाव मिळत नसल्याने संताप व्यक्त करत एका शेतकऱ्याने अशा प्रकारे निषेध व्यक्त केलाय. (Latest Ahmednagar News)
काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दरानी मोठा उच्चांक गाठला होता. मात्र आता उलट परीस्थीती झाली आहे. टोमॅटोला अगदी पन्नास पैसे ते दोन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील सागर धांगट या होतकरू तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटोची गाईंना मेजवानी दिलीय.
उत्पादनाचा खर्च देखील मिळत नसल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेती पिकांना चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी हवालदील झालेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून पिके घेतली आहेत. अशात साधा वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी व्याकुळ झाला आहे.
शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. शेतातून टोमॅटो काढून थेट रस्त्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.