>> सचिन बनसोडे
Radhakrishna Vikhe Patil on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री पदाबाबत जयंत पाटलांनी केलेलं वक्तव्य म्हणजे आपल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. मात्र आम्ही २०२४ च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असून पुन्हा युतीचे सरकार येणार आहे.
मविआमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त झाली असून महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, याची त्यांनी चिंता करावी, आस टोलाही विखे पाटलांनी जयंत पाटलांना लगावला आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
तत्पूर्वी अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा आहे, असं म्हटलं होत.
तसेच काँग्रेसचे मोठे नेते महाबळेश्वरमध्ये शिंदेंना भेटले अशीही चर्चा असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार फुटतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
उदय सामानात यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनीही त्यांना टोला लगावत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात, तसं एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटं नाही."
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.