कराड : एका कुटुंबात भांड्याला भांडे लागते. इथे तर तीन आहेत. थाेडे फार इकडे तिकडे हाेणारच. परंतु ते हाेऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंच्या (nana patole) नाराजीबाबतच्या प्रश्नावर व्यक्त केले. (ajit pawar latest marathi news)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा (satara) जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाना पटाेलेंनी पक्षाध्यक्ष साेनिया गांधी यांच्याकडे मविआतील (mva) घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. यावर तुमचे काय मत आहे असे विचारले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार काही महत्त्व द्यायचे कारण नाही. त्यांनी त्यांच्या नेत्यांना (leaders) काय सांगावे हा त्यांचा अधिकार आहे. देशाने अनेक सरकार पाहिली आहेत.
एका कुटुंबात असताना भांड्याला भांड लागते. इथे तर तीन कुटुंब आहेत. भांड्याला भांड हे लागणारच परंतु ते लागू नये म्हणून प्रयत्न करावा. हे सरकार नीट चालले पाहिजे, चालवले पाहिजे असे देखील पवार यांनी नमूद केले.
देशातील तसेच राज्यातील विविध पक्षांनी, नेत्यांनी महत्वाच्या प्रश्नांवर बाेलले पाहिजे. ते साेडून भरकटणारी चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती हरखून चालला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली दिशा भरकटत आहे. टाळी एक हाताने वाजत नाही हे ही तुम्ही लक्षात घ्या. सर्वांनीच समजंस वागले पाहिजे असे पवार यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.