
अकोला: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणा (OBC Reservation) संदर्भात आज निकाल दिला आहे. यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, हा ओबीसींवरील फार मोठा अन्याय असून ओबीसी समाज देशात मोठा आहे. राजकीय अस्तित्व संपण्याची भीती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. बच्चू कडू अकोल्यात (Akola) आले असता माध्यमांशी बोलत होते. दरम्यान कडू म्हणाले न्यायालयाने यामध्ये पुनर्विचार करावा.
केंद्रानेही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून राज्यानेही यामध्ये प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. राजकीय अस्तित्व असतच प्रत्येक समाजाला. म्हणून जातीनिहाय आपण आरक्षण ठेवतो. जर अशाने सर्व आरक्षण संपत असेल तर अस्तित्वाला धक्का बसू शकतो. न्यायालयाचा निकाल आहे. न्यायालयासमोर काहीच बोलता येत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. राज ठाकरे संदर्भात विचारले असता कडू म्हणाले, राज ठाकरे यांना अटक होणार नाही.
राज्यात तणावाचे वातावरण असून एखादी घटना राज्यामध्ये अशी घडली नाही. एखादी घटना जर काम मे कूच नाही आणि बातो मे सब हैं त्याच्यामुळे देशाचे आणि राज्याचे फार काही चांगले होऊ शकत नाही. कर्तव्याने आपण समोर निघाले पाहिजे. भोंगे हा विषय सामोपचाराने निघू शकतो. वाद करून तो सुटत नाही. आम्ही एक प्रयत्न करतो आहे की मंदिरावरील, मशीदवरील की राजकीय भोंगे असू दे प्रदूषण तर होतच आहे.
माझे वैयक्तिक मत आहे की भोंगे बंदच झाले पाहिजे. राजकीय भोंगे बंध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला मते द्या, आम्हाला मते द्या यासाठी कशाला भोंगे वाजवायचे. येणारी निवडणूक मध्ये बच्चू कडू सभेशिवाय भोंगे वाजविणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी ही निवडणूक भोंग्याशीवाय पार करणार. कारण याचा खूप त्रास आहे. मनसेमुळे सरकारवर काहीच परिणाम होणार नाही आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.