अमर घटारे -
अमरावती : अमरावतीच्या (Amravati) मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात, दूषित पाणी पिण्यात गेल्याने ५० हून अधिक नागरिकांना डायरीयाची लागण झाली आहे. खुल्या विहिरीतील पाणी पिल्याने डायरीयाची लागण झाली असल्याचं आरोग्य प्रशासनाकडून (Health Administration) सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गावातील वीजपुरवठा बंद केल्याने नागरिकांनी खुल्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरत होते. विहीर जमिनीलगत असल्याने त्यामध्ये बाहेरील केरकचरा गेला असावा त्यामुळे डायरीयाची नागरिकांना लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. सद्या या विहिरीवर पाणी पिण्यायोग्य नसल्याचं बोर्ड देखील लावण्यात आले आहेत. मात्र, यामुळे ३ नागरिकांचा मृत्यू झाला असून प्रशासनाला उशिरा जागं आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ -
यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे. रुग्णांवरती चुरनी आरोग्य केंद्रात त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये उपचार दिले जात आहेत. यावेळी अमरावतीच्या खासदारांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील भेट दिली होती. रुग्णालयात जाऊन रुग्णाची पाहणी केली. शिवाय आरोग्य विषयक सूचना देत दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं अविषांत पंडा यांनी सांगितलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.