अमरावती : जिल्हयात बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने, अमरावती जिल्ह्यातील उध्ववर्धा प्रकल्प, तसेच लहान- मोठ्या धरणात जलसाठा वाढला असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीकाठी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे, तर तिवसा तालुक्यात मागील ३ दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने तालुक्याच्या अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे.
हे देखील पहा-
यामध्ये कुऱ्हा, शिरजगाव, मोझरी, शिवणगाव, वरखेड यासह पुनर्वसित धारवाडा, दुर्गवाडा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावाच्या नदीला पुराचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले आहे. मदतीकरिता प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहे. तर तिवसा तहसीलदार वैभव फरतारे आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने आज सकाळापासूनच अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सरस्वती तलाव, टाकळी तलाव, मालखेड तलाव आणि सोनगाव शिवणी तलाव यामध्ये १०० टक्के जलसाठा झाला आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, एकपाळा, राजुरा, बोरी, मोगरा, धोत्रा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड- खिराळा मार्गाच्या मधातून वाहणाऱ्या चंद्र सूर्या नाल्यावर कमी उंचीचा पुल आहे.
या पुलावरून निमखेड बाजार ग्रामपंचायतीचे कर्मचारी साहेबखाँ बनेरखाँं (वय- ५८) आपली दुचाकी लोटत नेताना नदीत वाहून गेले आहेत. ही घटना सायंकाळच्या दरम्यान घडली आहे. गाडी लोटताना पाय घसरल्याने ते खाली पडले आणि नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. साहेबखाँ यांना शोधून काढण्याची शोध मोहीम प्रशासनाकडून सुरू होती.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.