अमरावतीत 144 कलम लागू: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत
अमरावतीत 144 कलम लागू: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन
अमरावतीत 144 कलम लागू: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहनSaam Tv

अमरावती : त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. राज्यात अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त प्रमाणात हिंसक वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. कालपासून अमरावती शहरात प्रचंड तणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. आज अमरावती मधील Amravati राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटला आहे. दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस Amravati Police आणि पालकमंत्र्यांनी केले असून देखील जमावाकडून हिंसक घटना घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्रिपुरा या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आज देखील दिसत आहे.

हे देखील पहा-

आज सकाळी अमरावतीत मोठ्या संख्येच्या जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर शहरातील राजकमल चौक परिसरात एका टपरीलाही एका जमावाने आग लावली आहे. या टपरीत सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र, भर बाजारात या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट दिसून येत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्याकरिता पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला आहे.

त्यानंतर जमाव हा मोठ्या प्रमाणात चिघळत गेले आहे. अमरावतीत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या प्रकारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या ठिकाणी असलेल्या भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यात असलेल्या सरकार विरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी यावेळी केला आहे.

अमरावतीत 144 कलम लागू: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन
Nandurbar: पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान

कालपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 144 कलम लागू असलेल्या, परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तात्काळ अटक करु शकतात.

या प्रकरणी वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. दरम्यान, अमरावतीत २ गटात वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगानियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला, तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com