बीड - निवडणूक विभागाची वेबसाईट सतत हँग होत असल्याने आणि सर्व्हर डाऊनमुळे, नामनिर्देशन करण्यापासून एखादा उमेदवार वंचित राहू शकतो. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून केली आहे. त्याचबरोबर मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना मागणीचे पत्रही पाठवले आहे.
धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं की, राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून,निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.
शुक्रवार दि.02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात. याबाबत मी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.