
औरंगाबाद: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिंदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करुन राज्य सरकारला ३ मेपर्यंत इशारा दिला आहे. नाहीतर भोंग्यावर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. उद्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरे या सभेसाठी आज औरंगाबादला पोहचले आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आहेत. त्यानी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि भाजपवर (BJP) टीका केली आहे.
कोणाच्या घरासोर हनुमान चालिसा वाचने चुकीचे आहे. आम्ही भाजप नेत्याच्या घरासमोर कुराण वाचतो असे म्हटले तर बरोबर होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन कुराण वाचली तर काय होईल, असंही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
महाराष्ट्रात सद्या दोन भावांचे भांडण सुरू आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली. या सभेला जाणून बुजून परवागनी दिली आहे. राज ठाकरे यांनी भाजपमध्ये कधी जाणार आहे, फक्त हे सांगावे, असा टोलाही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राज ठाकरे यांना लगावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.