अखेर मुहूर्त ठरला! 7 मे पासून आष्टी ते अहमदनगर रेल्वे होणार सुरू; दानवेंची माहिती

रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली जाहीर भाषणातून माहिती
Raosaheb Danve
Raosaheb DanveSaam tv

बीड - जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित करणारा मुहूर्त अखेर ठरला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील अहमदनगर - आष्टी दरम्यान येणाऱ्या 7 मे रेल्वे सुरू होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर केले आहे. मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

हे देखील पाहा-

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. या ट्रॅकवर 120 प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावलीय, त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Raosaheb Danve
प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी, परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष

आता ह्या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान अहमदनगर- आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक अधिक उत्सुक असून प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com