औरंगाबाद: राज्य सरकारने १५ दिवसांमध्ये सरकारने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली नाही तर आंदोलनाला सुरवात होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी दिला आहे. मराठा मोर्चाची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलताना पाटील (Vinod Patil) यांनी सांगितलं की, 'आजच्या बैठकीतील मागण्या आम्ही राज्य सरकारकडे मांडणार आहोत. येत्या १५ दिवसात सरकारने मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) भूमिका मांडावी.
मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत पुन्हा एकदा आमच्या भगिनी आपल्या भावना सराकरकडे मांडणार आहेत. तसंच समाजाचे ज्येष्ठ लोक, अभ्यासक सरकारकडे आमची भूमिका मांडणार असल्याचंही ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, मराठा समाजाला ज्या सरकारने आरक्षण दिले होते. ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या सत्तेत आले आहेत. त्यामुळे सरकाने आता आपली भूमिका येत्या पंधरा दिवसांमध्ये स्पष्ट करावी. सरकार आरक्षण देण्याची प्रक्रिया पुन्हा नव्याने करणार की, सुप्रीम कोर्टातील आरक्षण मिळवून देणार? लोकसभा निवडणुका १७ महिन्यावर आहेत, त्यापूर्वी तुम्ही आरक्षण देणार का? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आजच्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्यामध्ये, सारथी संस्थेला मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी द्यावा, सारथीला स्वायत्तता द्यावी. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किचकट प्रक्रियेत अर्ज करावा लागतोय, अर्ज करून निधी नसल्याचं कारण देत फेलोशिप दिली जात नाही. वैद्यकीय शिक्षणासाठी सरकारने शुल्क सारथीच्या मार्फत भरावं. सारथीला एक हजार कोटींचा निधी द्यावा अशा चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.