औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचा अखेर मृतदेहच पोलिसांना सापडला आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील एक तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार गंगापूर पोलिसांत (Police) नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस या तरुणीच्या शोधात होते. रविवारी अखेर तिचा मृतदेह पोलिसांना जुने कायगाव टोका येथील गोदावरी नदीपात्रात आढळून आला. (Aurangabad Latest Marathi News)
दिव्या अनिल दंडे (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या ही 09 जूनपासून घरातून बेपत्ता होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता. दरम्यान, रविवारी सकाळी तिचा मृतदेह औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुना कायगाव टोका येथील गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दिव्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. नातेवाईकांच्या परवानगीने पोलिसांनी डॉक्टरांमार्फत तिचे शवविल्छेदन केले. दरम्यान, दिव्याने आत्महत्या केली की, तिच्यासोबत घातपात झाला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या तरी या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.