औरंगाबाद : NEET परीक्षा एका दिवसावर आली असताना एका विद्यार्थीनीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरमध्ये शनिवारी (16 जुलै) रात्री ही घटना (Crime) घडली. ऋतुजा गणेश शिंदे (वय 18) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. (Aurangabad Latest News)
प्राप्त माहितीनुसार, ऋतुजा शिंदे ही विद्यार्थीनी NEET परीक्षेचा अभ्यास करत होती. ऋतुजाला बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ऋतुजाने पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली.
दरम्यान परीक्षा एका दिवसावर आली असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. (Aurangabad Todays News)
मात्र, परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ऋतुजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचा स्वभावही मनमिळावू होता. तिने असं अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.