अविनाश कानडजे
औरंगबाद: पती-पत्नीचे वाद मिटवण्यासाठी पूजा करण्याच्या नावाने साडे पाच तोळे सोने लांबवणाऱ्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भोंदू दांपत्याला औरंगाबाद (Aurangabad) शहरातील उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. आबिद रशीद आणि नगीना आबिद खान अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Aurangabad Crime News In Marathi)
महिलेच्या फिर्यादीनुसार, महिलेचे सोन्याचे गंठण, नेकलेस आणि कानातले रिंग असे दागिने घेऊन उस्मानपुऱ्यातील आलिशान कॉम्प्लेक्स मधील एका दुकानात बोलावले होते. या ठिकाणी एक महिला आणि पुरुष दुकानात बसले होते. त्यांनी सोन्याचे दागिने आणले का असे विचारून सर्व दागिने एका कपड्यावर ठेवायचे सांगितले. (Crime News)
दुसऱ्या दिवशी उघडून बघितले अन्;
त्यानंतर त्या कपड्याचे गाठोडे बांधून घरी जाऊन दुसर्या दिवशी उघडा असे या भोंदूनी महिलेला सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी उघडून बघितले असता त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा गोळा असल्याचे दिसले अन् त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून उत्तर प्रदेश मधील दोघांना अटक केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.