बीड - बीडमध्ये तडीपारीच्या विरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. एकाच शेतकरी कुटुंबातील बाप लेकांना गुंडाची टोळी म्हणत, दाखल गुन्ह्यात तडीपार करण्याचे आदेश दिल्यानंतर, अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांची गाडी ग्रामस्थांनी अडवलीय. तसेच गाडी समोर आडवे झोपण्याचा महिलांनी प्रयत्न देखील केलाय. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांचा गैरवापर करून सूड बुद्धीने कारवाई केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आलेला असताना, शेतकरी कुटुंबावर कारवाई केल्याने, पोलिसांच्या कारवाई वर प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीड जिल्ह्यातील 22 जणांच्या तडीपारीचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. त्यानंतर अटक करण्यासाठी आल्यानंतर गावातील नागरिकांनी ठिय्या केला.
हे देखील पहा -
बीड तालुक्यातील पिंपळनेर ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या, भवानवाडी गावातील एकाच शेतकरी कुटुंबातील हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप, अमोल हरिदास जगताप या तीन पिता पुत्रांना गुंडाची टोळी म्हणत तडीपारीचे आदेश दिले आहेत. या विरोधात गावकरी आक्रमक झाले असून अटकेची कारवाई करायला आलेल्या पिंपळनेर पोलीसांची गाडी अडवून, गावकर्यांनी दोन तास ठिया केला. तसेच राजकीय सूड बुद्धीतून लोकांवर कारवाई केली जात असल्यामुळे, महिला ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्या होत्या. राजकीय लोक पोलिसांचा गैरवापर करून सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे..
भाजप सातत्याने सरकारवर पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असताना, बीड मधील सत्ताधारी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाने पोलिसांचा गैरवापर करून सूडबुद्धीने कारवाई केल्या जात असल्याचा आरोप केला आहे. यात स्थानिक सत्तेतील लोकप्रतिनिधी खोटे गुन्हे दाखल करून, निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गुटका, वाळू, जुगार सुरू असताना, पोलीस प्रशासन शेतकऱ्यांना गुंडांची टोळी तर ठरवून तडीपार करणार असेल तर उद्धव साहेब तुम्हीच आम्हाला न्याय द्या. हात जोडून विनंती आहे तुमच्याच शिवसैनिकाला खोट्या गुन्ह्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. साहेब मला न्याय द्या अशी मागणी हनुमान जगताप यांनी केली आहे.
या कारवाईच्या विरोधात भवानवाडी गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबाचा गावाला काहीही त्रास नाही. मात्र खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे गावातील अवैध दारू विक्री सुरू आहे. या दारूविक्री करणाऱ्या कडून पोलिस महिन्याला पाच हजार रुपये हप्ते घेऊन कारवाई करत नाहीत. या अवैध दारु मुळे गावातील संसार उध्वस्त झाले आहेत. असे संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत असून निर्दोष लोकांवर कारवाई केली जात आहे. यामुळे पोलिस प्रशासन संरक्षणासाठी आहे का अन्याय करण्यासाठी ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.