जालना : जालन्याच्या परतूर तालुक्यातील श्रीष्ठी गावातून वाहणाऱ्या कसुरी नदीवरील नलकांडी पुलावरून राज्य परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना धक्कादायक घडली आहे. या बसमध्ये चालक आणि वाहकासह २३ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत माहिती समजताच स्थानिकांनी नदी पात्रात उड्या मारून प्रवाशांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेत पाण्यात वाहून जात असणाऱ्या दोन लहान मुलांना देखील वाचवण्यात यश आले आहे.
या घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी परतूर आणि आष्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून, वाहकाकडील तिकीट मशीन चालू करण्याचा प्रयत्न सुरु असून, बसमध्ये आणखी काही प्रवाशी होते का याचा शोध ग्रामस्थ आणि पोलिसांकडून केला जात आहे.
घटनास्थळी जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर च्या साहाय्याने वाहून गेलेल्या बस ला बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासन, आणि महसूल प्रशासनातील अधिकारी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरूच आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.