.....तर ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिला इशारा
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भारतीय जनता पक्षामध्ये चुरशीची लढत झाली. अपक्ष आमदारांची मते आपल्या बाजुनं फिरवून सहाव्या जागेसाठीचे उमेदवार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांचा भाजपच्या रणनीतीमुळं विजय झाला. एकीकडे राज्यसभेतील भाजपच्या विजयाचा धुरळा राजकीय मैदानात उडाला असतानाच दुसरीकडे (vidhan Parishad election) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (BJP) मोट बांधली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून नेते मंडळींनी टीका-टीप्पणी करायला सुरुवात केलीय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही त्यांच्या कवितेच्या शैलीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माध्यमांशई संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तुम्ही कितीही करा दावा, या तुम्ही परत आपल्या गावा.., असे म्हणत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विधानपरिषदेच्या निवडणूकिवरून निशाणा साधला आहे. सर्व विधानपरिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केंद्रीय मंत्री (Ramdas Athawale) रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान,अकोला महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे भाजप सोबत लढणार असल्याची भूमिका आठवलेंनी स्पष्ट केलीय.ते अकोल्यात एका विवाह संभारंभात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.